शिवप्रहार न्यूज - प्रसिद्ध IRS अधिकारी समीर वानखेडे यांचे शिवप्रहारच्या वतीने श्रीरामपुरात विद्यार्थ्यांना व्याख्यान...

शिवप्रहार न्यूज - प्रसिद्ध IRS अधिकारी समीर वानखेडे यांचे शिवप्रहारच्या वतीने श्रीरामपुरात विद्यार्थ्यांना व्याख्यान...

प्रसिद्ध IRS अधिकारी समीर वानखेडे यांचे शिवप्रहारच्या वतीने श्रीरामपुरात विद्यार्थ्यांना व्याख्यान...

श्रीरामपूर -देशातील प्रसिद्ध IRS अधिकारी श्री.समीर वानखेडे यांचे विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी करिअर गायडन्सपर व्याख्यान "शिवप्रहार प्रतिष्ठान"च्या वतीने दिनांक 25 जून 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता खासदार गोविंदराव अदिक सभागृह,संगमनेर रोड,श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.यावेळी शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख,माजी PSI सुरजभाई आगे हे देखील उपस्थित राहणार आहे.

         IRS समीर वानखेडे हे मुंबई नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे(NCB) संचालक असतांना त्यांनी समुद्रामध्ये जाऊन कारवाई करत बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यावर अंमली पदार्थ कायदे अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन राज्य सरकारमधील एका कॅबिनेट मंत्र्यावर देखील समीर सरांनी कारवाई केली होती.तसेच दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणामध्ये बॉलीवूडच्या अनेक हीरो-हीरोइनची चौकशी त्यांनी केली व काहींवर कारवाई देखील केली.भारत सरकारच्या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी(NIA)मध्ये कार्यरत असतांना समीर वानखेडे यांनी देशात अशांतता निर्माण करणारा झाकीर नाईक याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता व ISIS च्या अनेक दहशतवाद्यांना अटक देखील केली होती.अशा अनेक मोठमोठाल्या कारवाया त्यांनी कुणाचाही दबाव न ठेवता बेधडकपणे,डॅशिंगपणे केल्या आहेत.सन 2008 ला देशातील सर्वात अवघड परिक्षा UPSC पास करुन ते तेव्हापासुन भारतीय महसूल सेवेत(IRS) कार्यरत

आहे.

         असे सिंघम व्यक्तिमत्त्व असलेले देशभक्त,कर्तबगार अधिकारी समीरजी वानखेडे यांना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची आवड आहे. आपल्या देशाला घडवायचे असेल तर युवा पिढी घडली पाहिजे आणि त्यासाठी युवा पिढीला योग्य मार्गदर्शन मिळाले पाहिजे असे समीर वानखेडे यांचे मत आहे.त्यामुळेच ते खास विद्यार्थ्यांना करिअर संदर्भातील मार्गदर्शन व भावी आयुष्यासंदर्भात गायडन्स करण्यासाठी श्रीरामपुरात येत आहे.

        “शिवप्रहार प्रतिष्ठान”च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना योग्य वेळी,योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर त्यांच्या करिअरला एक योग्य दिशा मिळते व त्यांच्या हातून चांगले करिअर घडते आणि त्यातुनच देश घडतो,समाज घडतो.त्यामुळे पालकांनी ,विद्यार्थ्यांनी या भव्य करिअर गायडन्स सेमिनारचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवप्रहारच्या वतीने करण्यात आले आहे.सेमीनारला प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे.

(FREE ENTRY)