शिवप्रहार न्युज - दारू पिऊन का आले असे विचारल्याने पतीची आत्महत्या;दुसरीकडे लग्नाआधी तरुणाचा गळफास…

शिवप्रहार न्युज -  दारू पिऊन का आले असे विचारल्याने पतीची आत्महत्या;दुसरीकडे लग्नाआधी तरुणाचा गळफास…

दारू पिऊन का आले असे विचारल्याने पतीची आत्महत्या;दुसरीकडे लग्नाआधी तरुणाचा गळफास…

राहुरी - राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे परिसराततील रहिवासी श्री.अमोल नालकर यांना दारू पिण्याची सवय असल्याने ते दारू पिऊन आले असता त्यांची पत्नी त्यांना म्हणाली की,”तुम्ही दारू पिऊन का आला”.त्यामुळे त्याचा राग आल्याने रागात अमोल यांनी घराची कडी लावून छताच्या अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेतला. 

         तेव्हा पत्नीने आरडा-ओरडा केला असता नातेवाईक धावत आले आणि त्यांनी अमोलला खाली उतरवले. त्यावेळी कांबळे यांच्या रुग्णवाहिकेतून त्याला राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी क्षीरसागर यांनी तो मयत झाल्याचे घोषित केले.दरम्यान अमोल नालकर यांनी यापूर्वी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता अशी माहिती मिळत आहे.

         तर दुसऱ्या घटनेत राहुरी तालुक्यातीलच तांभेरे येथील तरुण विजय जाधव,वय-२२ याने राहत्या घरापासूनच काही अंतरावर असलेल्या एका झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत अधिक माहिती अशी समजते की,विजय जाधव,वय २२ वर्षे याचे १० जून २०२५ रोजी लग्न होणार होते.लग्न अवघ्या काही दिवसांवर आले असता विजयने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्व परिवारात,नातेवाईकांत शोककळा पसरली आहे.नेमके त्याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याची पोलीस चौकशी राहुरी पोलीस पोनि.ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे.