शिवप्रहार न्यूज- नायगाव, जाफराबाद, नाऊर, रामपूर 3 दिवसापासून अंधारात; वीज पुरवठा उद्यापर्यंत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आक्रमक भूमिका घेणार : संदीप शेलार...

शिवप्रहार न्यूज- नायगाव, जाफराबाद, नाऊर, रामपूर 3 दिवसापासून अंधारात; वीज पुरवठा उद्यापर्यंत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आक्रमक भूमिका घेणार : संदीप शेलार...

नायगाव, जाफराबाद, नऊर, रामपूर 3 दिवसापासून अंधारात; वीज पुरवठा उद्यापर्यंत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आक्रमक भूमिका घेणार : संदीप शेलार...

श्रीरामपूर- तालुक्यातील नायगाव, जाफराबाद, नाऊर, रामपूर हे चारही गोदावरी काठावरील गावे विद्युत पुरवठा बंद असल्याने तीन दिवसांपासून अंधारात आहेत.

 स्थानिक महावितरण प्रशासनाने कोणतीही पूर्व सूचना न देता वीज पुरवठा तीन दिवसांपासून खंडित केला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने गावकर्यांना तसेच शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नायगाव सबस्टेशनचे अधिकारी साठे यांना गावपुढार्यांनी या खंडित झालेल्या विजपुरवठ्याबाबत विचारणा करण्यासाठी फोन केले असता साठे हे कुणाचेही फोन उचलत नाही. या गावांमधील काही शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा विज बिल देखील आले आहे. 

वीज पुरवठा उद्या दिनांक 5 ऑगस्ट पर्यंत सुरळीत न झाल्यास चारही गावातील ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याचे जाफराबाद चे सरपंच संदीप शेलार यांनी म्हटले आहे.