शिवप्रहार न्यूज- तरुण शेतकरी महिलेचा विनयभंग...

तरुण शेतकरी महिलेचा विनयभंग...
केसापूर - श्रीरामपूर तालुक्यातील केशव गोविंद बन,बेलापूर खुर्दला लागून असलेल्या केसापूर या गावामध्ये एका तरुण शेतकरी महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,या तरुण शेतकरी महिलेच्या उसाचे नुकसान झाले म्हणून तिने आरोपींना जाब विचारला असता आरोपी बाबुराव पुजारी ,नितीन पुजारी,अक्षय पुजारी सर्व राहणार- केसापूर यांनी मिळून या तरुण महिलेचा विनयभंग केला व तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली आहे.
याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पिडीत महिला व तिच्या परिवाराच्या विरोधात देखील विनयभंग व बेकायदेशीर जमाव जमवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.