शिवप्रहार न्यूज-श्रीरामपुरात शिवछत्रपतींच्या विचारांची “भवानी दौड” संपन्न....

शिवप्रहार न्यूज-श्रीरामपुरात शिवछत्रपतींच्या विचारांची “भवानी दौड” संपन्न....

श्रीरामपुरात शिवछत्रपतींच्या विचारांची “भवानी दौड” संपन्न....

श्रीरामपूर- शिवकाळात प्रतापगडावर तुळजाभवानी मातेच्या नवीन बांधलेल्या मंदिरात शिवाजी महाराज भवानी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम करत असताना निघालेल्या पालखी सोहळ्यात महाराजांनी दलित मावळ्यांना पालखीला खांदा देण्याचा आग्रह धरला होता.परंतु तेथे उपस्थित असलेल्या काही जातीयवादी प्रवृत्तीच्या लोकांनी छत्रपतींच्या या हिंदू एकतेचा क्रांतिकारी निर्णयाला खो घालण्याचा प्रयत्न केला.महाराजांच्या हिंदुत्वामध्ये हिंदू समाजाचे एैक्य सर्वोच्च स्थानी असल्यामुळे महाराजांनी या हिंदू-हिंदूमध्ये भेद करणाऱ्या जातीयवादी प्रवृत्तीला चांगलेच खडसावले व हिंदू समाजात फूट पाडली तर याद राखा असा सज्जड दम देऊन भवानीमातेच्या पालखीला आपल्या दलित बांधवांना खांदा लावण्याचा मान दिला.

          ही परंपरा पुढे चालत राहावी यासाठीच “ भवानी दौड” हा उपक्रम 2017 पासून राबविण्यात येत आहे.या भवानी दौडच्या माध्यमातून दलित बांधवाच्या हस्ते नवरात्रीच्या दिवशी देवीच्या मंदिरावर भगवा ध्वज लावण्यात येतो व त्या माध्यमातून सर्व हिंदू जाती समान आहे हा हिंदू एकीचा संदेश शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाच्या विचारांतून देण्यात येतो. 

         आज देखील हि दलित बांधवाच्या हस्ते ध्वज लावण्याची परंपरा “शिवप्रहार प्रतिष्ठान”च्या मावळ्यांच्या माध्यमातून वढणे वस्ती,श्रीरामपूर येथे छोटेखानी स्वरुपात पार पडली.”शिवप्रहार प्रतिष्ठान”चे हिंदुत्वाचे विचार हे थेट

शिवछत्रपतींचे अठरापगड जाती एक करणारे हिंदुत्वाचे विचार आहे.’एक जात श्रेष्ठ व एक जात कनिष्ठ’ असे जातीयवादी सडके विचार शिवप्रहार मानत नाही.सर्व हिंदु जाती समान हे शिवप्रहार चे विचार आहे.शिवप्रहार चे हिंदुत्व जातव्यवस्था मानत नाही.

जय श्रीराम.

जय शिवराय.

जय लहूजी.

जय भिम.