शिवप्रहार न्यूज- तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणारे मातुलठाणचे आजी -माजी तालुकाप्रमुखांच्या गावच्या रस्त्याची झाली दयनीय अवस्था ...

तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणारे मातुलठाणचे आजी -माजी तालुकाप्रमुखांच्या गावच्या रस्त्याची झाली दयनीय अवस्था ...
मातुलठाण ( प्रतिनिधी ) श्रीरामपुर तालुक्यातील मातुलठाण येथील अतिशय महत्वाचा समजणाजाणारा मातुलठाण__गोडेंगाव रस्त्याचे काम तब्बल सात आठ महीण्यापासुन रखडले आहे .संबंधीत ठेकेदारांने काम खुपच संथ गतीने चालु केले होते दोन महिन्यापासुन पुर्ण रस्ता उखडून ठेवलेला असुन तसेच ऐन पावसाळ्यात संपूर्ण रस्ता उखडून ठेवल्याने रस्त्याने चालणे देखील कठीण झाले आहे, संबंधीत ठेकेदाराने रस्त्याच्या कामाकडे पूर्ण पणे दुर्लक्ष केले असुन ठेकेदारावर कार्यवाही करून त्यांच्या कडून हे काम काढून दुसऱ्या ठेकेदारास द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे .
या बाबत योग्य कार्यवाही न झाल्यास येत्या आठ दिवसात उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ व शाळकरी मुलांनी दिला आहे.
आमदार लहु कानडे यांच्या निधीतुन मातुलठाण = गोंडेगाव रस्त्यासाठी तातडीने निधी मंजुर करून दिला . काही महीण्यापूर्वी मोठ्या दिमाखात उद्घाटन होऊन तात्पुर्त्या स्वरूपात कामास सुरवात झाली होती.सुरवातीला ठेकेदारांकडून साईडलाईनचे काम पूर्ण करून कामाची सुरूवात करण्यात आली .परंतु त्यानंतर अर्धवट खडी टाकुन रस्त्याचे काम बंद केले . गंजरस्त्यात टाकल्यामुळे रस्ता अरुंद झाल्याने वाहन चालकाना मोठी कसरत करावी लागत होती.शेतकऱ्यांना माल वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडचनीस सामोरे जावे लागले. दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्वाचा असुन गोंडेगावला शालेय शिक्षणासाठी मातुलठाण मधुन मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ये -जा करत असल्याने विषेशत: विद्यार्थीना मोठी तारेवची कसरत करावी लागते.
संबंधीत ठेकेदारांनी ग्रामस्थ व विद्यार्थाचा आक्रोश लक्षात येताच पुढील काम पुन्हा सुरु केले व येथील खडीचे गंज संपूर्ण रस्त्यात पसरवले व जेसिबीच्या साह्याने संपूर्ण रस्ता उखडून टाकला व उघडी खडी पसरवुन तशीच सोडून दिली आहे, खडी जशीच्या तशी उघडी असल्याने शालेय मुलांना सायकल देखील चालवणे कठीन झाले आहे.अनेक वेळेस या रस्त्यावर विधार्थी पडून जखमी झाले , काही दिवसार्वी मातुलठाण जिल्हा परिशद शाळेच्या शिक्षीका पडून जबर मारलागला होता .ही बाब खुप गंभीर असुन संबंधीत ठेकेदारांकडून या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.त्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे त्यावर कठोर कार्यवाही करावी अशी ग्रामस्थ व विद्यार्थीकडून व्यक्त होत आहे.
येत्या आठ दिवसात रस्त्याचे काम मार्गी न लागल्यास ग्रामस्था सहविद्यार्थी यांनी उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.तालुक्याचे आमदारांनी या प्रश्नाकडे विषेश लक्ष घालावे अशी अपेक्षा ग्रामस्थांची आहे.